एका मोर्चाची गोष्ट पु ल देशपांडे Eka Morchachi Gosht

... मला कधी क्रांती, मोर्चे घेऊन- फलक घेऊन येते असं वाटत नाही.किंबहुना, मी कधी मोर्चातून घोषणा देत किंवा ओरडत गेलो नाही. मुंबईत मीअसंख्य मिरवणुका पाहिल्या आहेत. अगदी एकतीसाच्या चळवळीपासून तेआजतागायत. माझी पुष्कळदा त्या मोर्चेवाल्यांच्या मागण्यांशी संपूर्णसहानुभूती असते. पण मला रस्त्यातून माणसं अशी ओरडत निघाली कीगलबलतं. मोर्चे हे एक तंत्र झालंय असंही म्हणतात. असेलही. पुढारीपण हाधंदा झाल्यावर मोर्चे-घोषणा ही धंद्याच्या जाहिरातीची तंत्रं होणं साहाजिकआहे. पण या मोर्चाने मात्र मी अगदी आतून हलून गेलो होतो. त्या मोर्चाच्याअग्रभागी चांगले वयोवृद्ध लोक होते. चारी वर्णांचे लोक दिसत होते. बायकाहोत्या. कामगार स्त्रिया वाटत नव्हत्या, पण फार सुशिक्षितही दिसतनव्हत्या. बऱ्याचशा पांढऱ्या पोशाखांत होत्या. पण नर्सेस नव्हत्या. आणिआश्चर्य म्हणजे त्या मोर्चात मुलं अजिबात नव्हती. मी हा मोर्चा अगदी काहीखेड्यांत पाहिला नाही. पण मोर्चातली माणसं शहराशी फार रुळलेली दिसतनव्हती. एका जिल्ह्माच्या गावाला पाह्मला होता. मी सायकलीवरुन उतरलोआणि विचारलं,

'कुणाचा मोर्चा आहे हो हा?'

'शाळामास्तरांचा- '

एक चमत्कारिक लज्जा, असहायता, संतापापेक्षाही कारुण्य, यापूवी- आम्हीअसे कधीही हिंडलो नव्हतो...असा प्रासंग आमच्यावर येईल असं वाटलंनव्हतं असं न सांगता न बोलता नुसतं चेहऱ्यावर अदृश्य अक्षरांनी लिहून तोमोर्चा चालला होता. सर्वात पुढे फलक होता. तो वाचायला मिळाला नाही.कुणी कुणाचा जयजयकार करीत नव्हतं. कुणी बोलत नव्हतं. मुठी वळतनव्हत्या. त्वेष नव्हता. आवेश नव्हता. आजवर आवरुन धरलेली एक अब्रूपरिस्थितीच्या तडाख्याने फुटली होती आणि रस्त्यांतून सांडत चालली होती.माझ्या कानी शब्द आले... 'अय्या त्या बघ आपल्या दामलेबाई' एकपेन्शनीला आलेली विधवा वृद्धादेखील पोटाला दोन वेळचं मिळत नाही हेयापूर्वी पोटात दडवून ठेवलेलं वाक्य न बोलता सांगत निघाली होती.दामलेबाईंची नजर त्या पोरींच्यावर गेली. पोरी तोंडावर हात घेऊन लाजल्या.आपल्या दामलेबाई, पुढे कुठे बॅंड नाही- घरात नाही- तरीसुद्धा भर शाळेच्यावेळी अशा कुठे रांगेतून चालल्या आहेत हे त्या पोरींना कळत नव्हतं.

पण दामलेबाईंनी ज्या अनोळखी नजरेनं त्या पोरींच्याकडे पाहिलं, ती नजरत्या पोरींना नवी होती. ज्या बाईंना फुलं नेऊन दिल्यावर कौतुकाचागालगुच्चा घेतात त्या आपल्या दामलेबाईंची नजर अशी परकी? पोरीबावरल्या. ह्मा दामलेबाई अशा काय निराळया दिसताहेत? आपल्या बरोबरगाणी म्हणणाऱ्या, कधी कधीसुद्धा छडी न मारणाऱ्या दामलेबाईच ना त्या?दामलेबाईंनी कष्टाने सावरुन धरलेले ते तोंडावरचे 'शिक्षिकेने प्रेमळ असावे' चेकवच कशामुळेतरी फुटले होते. नुसत्या दामलेबाईंचेच नाही- सावंतबाई,साठेबाई, गुंजाळबाई, लोकरेबाई, शेखबाई, थोरात गुरुजी, भांगले गुरुजी,दाढे गुरुजी, तांबे गुरुजी, कुलकर्णी, देशपांडे, तांबट, कोष्टी, पागे, माने,साटम, काळे सगळया सगळया गुरुजींना जो प्रसंग कधी कधी यायला नकोहोता तो आला होता. शिक्षकांचा मोर्चा नावाची एक फार मोठी क्रांती झालीहोती. पूर्वी शिक्षक मोर्चात गेले होते. गांधींच्या मागून मुलांना राष्ट्रीयत्वाचेधडे देण्यापूर्वी आपण शुद्ध होऊन येऊ या म्हणून. हा मोर्चा निराळा होता. हापुकारा भावनेचा नव्हता. साधा, भूक नावाच्या प्राथमिक गरजेपोटी प्राथमिकशिक्षक प्रथम रस्त्यात आपले लक्तर मोकळे टाकून आला होता. मी त्यामोर्चामागून चालत गेलो हे तो मोर्चा चौकात आला त्या वेळी कळले.पोलीससुद्धा नव्हते. मास्तरांच्या मोर्चाला पोलीस कशाला? शंभर उंदीरएकदम कुचकुचले म्हणून काय एका डरकाळीइतका तरी आवाज थोडाचहोणार आहे? कोणीतरी बसा बसा म्हणू लागलं. मैदानात मोर्चा बसला.मीदेखील सायकल झाडाला टेकून बसलो. एक शिक्षक उभे राहिले. दुरुन मलाते थोडेसे हरी नारायण आपट्यांसारखे वाटले. रुमाल बांधलेले असे ते एकटेचहोते. शुद्धलेखन घालावं तसं ते बोलत होते. त्यांची लहान लहान वाक्यं एकेकाशब्दावर जोर देऊन येत होती.

"शिक्षक बंधुभिगनींनो, व्यवसायाची पुण्याई संपली. समाजाने अंत पाहिला.सरकारने कशाला म्हणू? सरकार आपले आले काय, परक्याचे काय, आपलेदुबळे हात पोहोचण्याच्या पलिकडले. पण समाजाने कातडे ओढले स्वत:च्याडोळयावर. 'मास्तर, दोन वेळेची चूल पेटते ना हो?' असं विचारणारं इतक्यावर्षात कोणी भेटलं नाही. दडपलं होतं. पण आज आपल्या भुकेचं बेंड रस्त्यातफुटलं. आता सभ्यतेचा बुरखा कशाला ठेवू? हा माझा कोट. पंधरा वर्षांपूर्वीलग्नात मिळाला होता. सद्राही होता. तो फाटला, नवा शिवायचा संकल्पसोडत होतो. नाही परवडलं. खोटं नाही सांगत. हे पाहा." असं म्हणून त्यांनीस्टेजवर कोट काढला आणि आतला अस्थिपंजर डोळयावर भयानक आघातकरुन गेला. "आता रस्त्यात आलो. इच्छा नव्हती पण गत्यंतर नव्हतं. आताआत शर्ट नसतो. एका फुकट मिळालेल्या कोटावर व्यवसायाची प्रतिष्ठासांभाळीत होतो हे गुपित उघडं केलं. माझी काय सगळयांची गोष्ट एकच!व्यवसायाची पुण्याई संपली. आमची एकच विनंती. उपाशी ठेवून गुरुजी वगैरेनका म्हणू. नवराबायको आणि दोनचार अर्भकांच्या भुकेच्या वेळा साजऱ्याहोतील एवढं द्या आणि मग शाळा खात्यातले मजूर म्हणा आणि एज्युकेशनआक्टा ऐवजी फ्याक्टरी आक्ट लावा." काढलेला कोट खांद्यावर घेऊनमास्तर खाली उतरले. माणसं भाषण संपल्यानंतरच्या टाळया वाजवायलाविसरली होती. कारण त्या सर्व स्त्रिपुरुषांचे हात डोळे पुसण्यात गुंतले होते.माझ्या मनात घर करुन राहिलेला हा एकच मोर्चा आणि मोर्चातले ते एकचभाषण आणि दामलेबाईंनी त्या पोरींकडे फेकलेली ती एकच अनोळखी नजर!

(- 'पु. ल. एक साठवण')